विल्ये रत्नागिरी येथे पौष पौर्णिमा आणि सावित्रीमाई फुले जयंती कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी दि. ८ :- मौजे विल्ये,बौद्धजन विकास कमिटी स्थानिक तसेच क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला मंडळ, मानका आप्पा समिती आणि मिलिंद जलसा कलानिकेतन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पौष पौर्णिमा आणि क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन अशोक कांबळे आणि मेघा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर बौद्धाचार्य अरविंद कांबळे यांच्या माध्यमातून बौद्ध पूजा पाठ घेऊन सावित्रीमाईंना वंदन करण्यात आले. सावित्रीमाई फुलेंच्या सामाजिक योगदानाबद्दल त्यांच्या जीवन पटावर भाष्य करताना अंधार युगात क्रांती ज्योतीचा उदय कसा झाला,
लहानपणापासूनच अन्यायाच्या विरुद्ध बुलंद आवाज उठविणाऱ्या तसेच म. फुलें सोबत मुलींसाठी पहिली शाळा काढण्याचा धाडसी प्रवाहाविरुद्ध क्रांतिकारी निर्णय,विधवा विवाहाचे क्रांतिकारी कार्य, मराठीतील आधुनिक कवितेच्या जनक सावित्रीमाई, यावर मार्गदर्शन वक्ते- सौ.मेघा कांबळे, नरेश कांबळे,जनार्दन कांबळे, कु.नील कांबळे तसेच अध्यक्षीय भाषणातून सुवेज कांबळे मार्गदर्शन यांनी केले तर,नरेश कांबळे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.सदर कार्यक्रमावेळी मिलिंद जलसा कला निकेतन मंडळाचे आजी- माजी कलाकार, गायक, मोठ्या संख्येने उपस्थित होते, याच कार्यक्रमा दरम्यान जेष्ठ सदस्य जलसा धम्म गीत गायक कालकथित – भिकाजी काशीराम कांबळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.



