रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संजय राजाराम रेडीज यांचे दुःखद निधन

रत्नागिरी दि. १० :- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संजय राजाराम रेडीज यांचे गुरूवार दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांनी गेली २९ वर्षे जिल्हा बँकेवर संचालक म्हणून कामकाज पाहिले आहे.

ते चिपळूण वैश्य समाजाचे प्रमुख आभारस्तंभ, चिपळूण नगर परिषदेचे माजी नगरसेवक, चिपळूण अर्बन बँकेचे माजी चेअरमन व कुटुंबप्रमुख होते. त्याचप्रमाणे ते चिपळूण अर्बन बँकेचे संचालक होते. तसेच मोठे उद्योजक व व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख होती. मनमिळावू स्वभाव, सर्वांना सांभाळून घेणे, बँकेच्या विविध विषयांमध्ये सक्रीय भाग घेणे, गोरगरिबांना नेहमी मदत करणारे म्हणून त्यांची ख्याती होती.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्व स्तरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांचे निधनामुळे चिपळूण तालुक्यातील सहकार क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ तसेच अधिकारी व कर्मचारी यांचेमार्फत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button