
रत्नागिरी दि. ७ :- जगभरात कोकणच्या देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याला मोठी मागणी आहे. कोकणातील शेतकऱ्यांना याच हापूस आब्यांने आर्थिक सुबत्ता मिळवून दिली आहे. मात्र आता गुजरात राज्यातील गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने २०२३ मध्ये वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी मागणी केली आहे. त्यामुळे कोकणातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. अशाप्रकारे जर कोकण हापूसची ओळख पुसण्याचा प्रयत्न झाल्यास हे सहन करणार नसल्याचा इशारा कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी दिला आहे.
कोकणच्या हापूस आंब्यासमोर आता गुजरातच्या वलसाड हापूसचे आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. गुजरातने वलसाड हापूससाठी भौगोलिक मानांकन मिळवण्याची तयारी सुरू केली आहे. गांधीनगर आणि नवसारी कृषी विद्यापीठाने यासाठी पुढाकार घेतला असून या मागणीमुळे कोकणातील आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.
कोकण हापूसला २०१८ मध्ये भौगोलिक मानांकन मिळाले होते. ज्यामुळे त्याला जागतिक बाजारपेठेत स्वतंत्र ओळख मिळाली. मात्र आता वलसाड हापूसलाही हे मानांकन मिळाल्यास कोकणच्या हापूसची ओळख पुसली जाण्याची आणि दरांवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. या अहवालात गुजरातच्या.दाव्याची आणि कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
हापूस ही कोकणची ओळख आहे यासाठी सर्व नियम अटी पाळून कागदपत्र सादर केली आहेत. २००८ ते २०१८ पर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली हापूस हा कोकणातील ओरिजनल आहे हे सिद्ध करावे लागले. त्याच वेळेला भौगोलिक मानांकन हापूस मिळाले जर हे मानांकन अन्य कोणाला मिळाल्यास वेळ पडल्यास सर्व न्यायालय लढाई आम्ही लढू शिवाय सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा आम्हाला पाठिंबा असेल याची आम्हाला खात्री आहे अशी प्रतिक्रिया कोकण हापूस उत्पादक आणि विक्रेते संघाचे अध्यक्ष डॉ विवेक भिडे यांनी दिली.



